हळू हळू विसरून जाणार सगळे आता...
आणि मग एक अनोखा अवघडलेला दुरावा साचणार..
आणि मग पुन्हा जेव्हा भेट होईल तेव्हा बरेच काही बदललेले भासेल..
तुलापण आणि मलापण..!
मग काही शिष्टाचार मध्ये येतील मदत करायला.. विचारपूस होते.. आणि मग सगळे आपापल्या मार्गाला..
काहीतरी निसटून जाते आहे ही जाणीव सर्वांनाच.. पण त्याचा विचार करायला वेळ नसणार ..
बर्याच गोष्टी अशाच निसटून जातात.. काही कळत.. काही नकळत..
कधीतरी काहीतरी टोचते आत खोलवर..
पण कळतच नाही काय आहे ते..
कारण आठवणी पण अशाच पुसून गेलेल्या असतात.. फ़िकट झालेल्या असतात..
तरीही काही आठवणींचे वास मागे उरलेले .. सगळे एकमेकांत मिसळलेले..
आणि एखाद्या संध्याकाळी.. कातरवेळी मग मन का भरून आले ते आपल्याला पण कळत नाही...
-- सच